Uncategorized

लाभार्थ्याची अळवनूख केल्यास होईल मोठी कार्यवाही.

ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सावध व्हावे. संजिता मोहपात्र.

सत्य दर्पण मेळघाटन्यूज.संपादक प्रवीण मुंडे.

चिखलदरा.. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवाज योजनेतील घरकुले मंजूर झाली आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. ही कामे करताना घरकुल लाभार्थी व मनरेगाची किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत कर्मचारी असो वा ग्राम रोजगार सेवक असो किंवा तांत्रिक अधिकारी असो यांनी जर लाभार्थ्याकडून पैशाची मागणी केल्यास लाभार्थ्यांनी याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे थेट मोबाईलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहोपात्र यांनी केले आहे. चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवाज योजनेतील घरकुल मंजूर झालेली आहेत. सर्व मंजूर लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप केले असून घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम बॅक खात्यावर जमा झालेली आहे. लाभार्थ्याकडून विहिरी गुरांच्या गोठा शेडी सेट पोल्ट्री शेड कालावधीत बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी यंत्रणेवर आहे. अशातच ग्रामविकास मंत्र्यांनी 6 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विभागीय बैठकीत आवास योजना मनरेगा आधी कामांची गुणवत्ता उच्च ठेवण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यावर असून आठ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर संजिता महापात्र यांनी ग्रामीण भागातील घरकुलांचे लाभार्थी व मनरेगाची किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थ्यांची अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी केल्यास संबंधित बी डि ओ किंवा सीईओ कडे मोबाईल वर तक्रार करण्याच्या आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button